धारूर/ प्रतिनिधी सचिन घोडके
धारूर शहरातील 1992 मध्ये नगरपालिका अस्तित्वात आली ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक महत्त्व असणारे शहर नेहमीच मूलभूत सुविधा पासून कोसो दूर राहिले आहे 1992 पासून नगरपालिकेत सातत्याने सत्ता बदल होत गेले. नवीन नेतृत्वाला संधीही मिळाली. चौसाळा मतदार संघात असताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी तालुका निर्मिती केल्याने पालिकेची सत्ता त्यांच्या बाजूने गेली होती. अनेक वेळा भाजपलाही सत्तेत संधी दिली. हा तालुका नवीन मतदार संघात गेल्यावर माजी मंत्री प्रकाश सोळुंके यांच्यावर विश्वास ठेवून पालिकेची सत्ता तीन वेळा त्यांच्या हातात गेली माजी आमदार जनार्दन तुपे, दिवंगत आमदार आर. टी.देशमुख, काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील यांच्या नेतृत्वात आघाडी देऊन शहराने विकासाच्या अपेक्षा सातत्याने व्यक्त केल्या, परंतु मूलभूत प्रश्न सुटलेच नाही. येथील ऐतिहासिक किल्ला सीता कुंड आंबाचंडी देवी माता मंदिर ही पर्यटन स्थळे शासनाकडून दुर्लक्षित राहिली असून,म्हनावा तसा विकास होऊ शकला नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीचा याचा हिशोब होईल असे चित्र दिसत आहे.
( चार पक्षात प्रमुख लढत ) धारूर नगरपालिका निवडणूकित भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच एकनाथ शिंदे शिवसेना गट या चार पक्षांमध्ये प्रमुख लढत होत आहे. असे चित्र स्पष्ट दिसत आहे.चारही पक्षामध्ये नवखे तरुण उमेदवार असल्याने त्यांच्याकडून शहरवासीयांच्या विविध अपेक्षा आहेत व या शहरात मूलभूत सुविधा वरची Effects लढवली जाणार आहे.























